Loading...
ब्रेकिंग न्यूज :
विद्यार्थ्यांचे यश हीच गुरुंना खरी गुरुदक्षिणा ढोरेगाव शाळेचा राज्यासाठी आदर्श उपक्रम बोरवंड बुद्रुक जि. प. शाळेने अभिनव ग्रंथदिंडीतून दिला संविधान जागर, वाचन चळवळीचा संदेश भक्ती, संस्कार आणि पर्यावरणाचा उंबरखडवा शाळेत सुंदर संगम आटपाडी जिल्हा परिषद शाळा क्रमांक ३ सह अंगणवाडीची बालदिंडी दिमाखात संपन्न विद्यार्थिनींच्या पुढाकारातून जानापुरी शाळेत गुरुपौर्णिमा संस्कारमय वातावरणात साजरी लोकनायकच्या दुसऱ्या आवृत्तीचे आज प्रकाशन तडवळे जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी वंचितांच्या वेदनांना शब्द देणारा युगपुरुष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती - लेखन प्रेरणा दिन लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे ... संच मान्यतेच्या नव्या निकषाने ३० हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात शिष्यवृत्तीत अंश्रुली तोडकरचे देदिप्यमान यश साताऱ्याचे 'वायसीआयएस' महाविद्यालय ठरतेय विद्यार्थ्यांची खरी 'लाईफलाईन' वत्सलादेवी स्कूलमध्ये अनोख्या पद्धतीने पालक, शिक्षकांचे पाद्यपूजन करून गुरुपौर्णिमा साजरी गोकुळ-धावडे विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी 'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत भवानीनगर शाळेत विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप ज्ञानदिंडीच्या उत्साहात पाटखळ गटाची गुणवत्ता विकास समिती सहविचार सभा जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम
mumbai,Maharashtra,India

शिक्षकांना वेतन नाही तर 'लाडकी बहीण' योजना बंद करा

कोर्टाने सरकारला खडसावले!
शिक्षकांना वेतन नाही तर 'लाडकी बहीण' योजना बंद करा

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला कडक शब्दांत फटकारले आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या निवृत्तीवेतनासाठी निधीची कमतरता भासत असेल, तर 'लाडकी बहीण' योजना तातडीने बंद करावी, असे स्पष्ट आदेश देत न्यायालयाने सरकारच्या प्राधान्यक्रमांवर तीव्र संताप व्यक्त केला.

न्यायालयाने पुढे म्हटले की, महानगरपालिकेच्या तिजोरीत पैसा नसेल तर आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्या विकूनही कर्मचाऱ्यांचे थकित निवृत्तीवेतन तातडीने द्यावे. मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने सरकार व पालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले.

'लाडकी बहीण'सारख्या योजनांवर बंदी घाला

दीड वर्षांपूर्वी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेला नागरिकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. विधानसभा निवडणुकीत महायुतीला या योजनेचा मोठा राजकीय फायदा झाला. अनेक 'लाडक्या बहिणीं'नी सरकारला भरभरून मतदान करून निवडून दिले. मात्र याच योजनेवर बरीच टीका होत आहे. राज्य सरकार आर्थिक अडचणीत सापडल्याची चर्चा रंगली आहे. महत्त्वाकांक्षी योजनांसाठी विविध विभागांचा निधी वळवला जात असल्याचेही समोर आले आहे.

निवृत्त कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या रकमेसाठी सरकारी तिजोरी रिकामी असल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी दर्शवली. "कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी पैसा नसेल तर 'लाडकी बहीण'सारख्या योजनांवर बंदी घाला," अशा कठोर शब्दांत न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले.

या प्रकरणात मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातून निवृत्त झालेल्या एका महिला कर्मचाऱ्याला सातव्या वेतन आयोगानुसार पेन्शन व इतर लाभ मिळाले नव्हते. वारंवार पाठपुरावा करूनही पालिकेने रक्कम दिली नाही. शेवटी त्या कर्मचाऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने पालिकेच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. अतिरिक्त आयुक्तांना नियमित वेतन मिळते, मग शिक्षकांना का मिळत नाही? वरिष्ठ अधिकारी सर्व सुविधा घेतात, पण आयुष्यभर सेवा दिलेल्या शिक्षकांसाठी पैसा नाही, यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले.

न्यायालयाने पालिकेला धारेवर धरत म्हटले, "आता आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वेळ आली तरी सातवा आयोगही लागू केला नाही." पैसे नसतील तर पालिका कार्यालयातील टेबल, खुर्च्या व एअर कंडिशनर विका, असेही न्यायालयाने सुनावले. "तिजोरी रिकामी असेल तर महानगरपालिका आयुक्त व इतर अधिकाऱ्यांच्या आलिशान गाड्या विकूनही कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन तातडीने द्या," असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला. कर्मचाऱ्यांचा हा मूलभूत हक्क असून त्यांना यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणाची गांभीर्यता लक्षात घेऊन उच्च न्यायालयाने अतिरिक्त आयुक्तांना याबाबत स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या कडक भूमिकेमुळे राज्य सरकार व महानगरपालिकेवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी न्यायालयाने घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता सरकारला आपल्या योजनांबाबत नव्याने विचार करावा लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.