Loading...
ब्रेकिंग न्यूज :
मुख्याध्यापक, केंद्र संचालक निलंबित राजा दख्खनचा श्री ज्योतिबा राजा मायेचा प्रेमळ स्पर्श... मानवतावादी विचारवंत डॉ. म. सु. पगारे यांचे गावासाठी ८६ हजाराचे ३८१ पुस्तकांचे दान जावळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत झेंडा उंचावला जि.प. च्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करणार काले येथील मुलांच्या शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरुरमध्ये मुलींची बाजी मारुल तर्फ पाटणच्या दुर्गम भागातील २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्याची मागणी, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद रेणुका कदम - चौधरी यांचे सीटीईटी परीक्षेत यश गळनिंब शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रकाश पाचपुतेंतर्फे पाणी बॉटल लिंब केंद्रातील १० शिक्षकांचे सीटीईटी परीक्षेत सुयश संघर्षाचा ज्ञानदीप : कृष्णा शंकर रोकडे इथे एप्रिल फुल तर रोजच होतो आहे !! शिक्षक घरी येऊन अॅडमिशन करून देणार मार्च ते जून दरम्यान शासनातर्फे जनजागृती राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय जेजुरीत ९९ वर्षांच्या आजोबांनी दिली 'नवभारत साक्षरता' परीक्षा सीटीईटी फेब्रुवारी २०१६ चा निकाल १५.६८ टक्के शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे ढोरेगाव शाळेत अत्याधुनिक स्टेम लॅब विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानातील रोमांचक सफर.. शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार रुग्णसेवेतील 'प्रतिभे'ची यशोगाथा तप्त धरती - तहानलेले प्राण शाळांमध्ये क्रीडा, कला शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण येणार, आशिष शेलार यांनी दिले संकेत नेवाशातील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरु केले वर्तमानपत्र वाचनालय समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार : डॉ. योगेश सुरवसे जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत शुभांगी भोसले यांचे यश रोहिणी औतडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : दीपक रोकडे शिरवळ मुले, मुलींच्या शाळेस भेट देऊन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले कौतुक काटेसावर इतिहासाच्या पाऊलखुणाः शोध की विस्मृती? शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची टीडीएफ संघटनेची मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे गुणपत्रक - प्रमाणपत्र आता एकाच वेळी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी पालकांना करमाफी होण्याची शक्यता हवेलीत 'शिक्षक सक्षमीकरण'चा जल्लोष लोणी काळभोरमध्ये स्पर्धा उत्साहात नवोदयसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा देवनांद्रा साकाप जि. प. शाळेत सत्कार जि. प. विद्यार्थ्यांनी काढला 'मुंबई अभ्यास दौरा' आमोंडीच्या संगीता वळसे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार बोपोर्डी शाळेच्या मुलांची आज सातारा आकाशवाणीवर 'धमाल' जत तालुका शिक्षक संघाकडून डॉ. सलगर, प्रा. हिप्परकर यांचा सत्कार मणेरी केंद्रातील १२ शाळांना पुण्याच्या 'उर्मी' कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप तर्कशुद्ध विचार करणं हे माणूस असण्याचं पहिलं लक्षण बुवाबाजी : संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आनंदाचं झाड बालसाहित्य पुरस्कार उत्तम सदाकाळ यांना प्रदान मुलाच्या वाढदिनी पालकांकडून कनेगाव शाळेला दिले पंखे भेट कन्नड तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा विशेष आनंद
Akola,Maharashtra,India

पटसंख्या निकष संचमान्यतेमुळे शिक्षकांची पदे धोक्यात

शिक्षण हक्क निकषाला पोहोचणार बाधा : डॉ. बोर्डे
पटसंख्या निकष संचमान्यतेमुळे शिक्षकांची पदे धोक्यात

अकोला : पटसंख्येच्या निकषावरील संचमान्यतेमुळे असंख्य शाळांमधील शिक्षकांची पदे धोक्यात आली आहेत. शिक्षकाविना शाळा हे धोरण अन्यायकारक ठरत असल्याची भूमिका विज्युक्टाने मांडली आहे. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गटनिहाय किमान तीन शिक्षक गरजेचे असून त्या दृष्टीने निर्णय घेण्याची मागणी विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ.अविनाश बोर्डे यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.

तुकडी निकषाऐवजी विद्यार्थी संख्येच्या आधारावर कार्यभार गणना करतांना त्यासाठीचे प्रचलित सर्व निकष व शासन आदेश अधिक्रमित करून १५ मार्च २०२४ च्या शासन आदेशात दिलेल्या पटसंखेच्या निकषानुसार संचमान्यता केली जात आहे. २००९ च्या शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार पटसंख्येच्या प्रमाणात शिक्षकांची पदे भरली जात होती.

मात्र, शासनाच्या १५ मार्च २०२४ च्या आदेशानुसार त्यात बदल झाल्याने शिक्षण हक्क कायद्यातील निकष सुद्धा बाधित होत आहेत. यामुळे अनेक शाळा एकच किंवा शुन्य शिक्षकी होतील. ४० च्याऐवजी ३९ विद्यार्थी संख्या झाल्यास शुन्य शिक्षक अशी अवस्था निर्माण होईल. ग्रामीण भागातील अनेक शाळा शिक्षकाविना होतील.

राज्यात मोफत शिक्षण घेणाऱ्या शहरी तथा ग्रामीण शेतकरी मुलांना शिक्षकाशिवाय शिक्षण घ्यावे लागेल. ही बाब त्यांना शिक्षणापासून वंचित करणारी असून त्यांच्यावर अन्याय करणारी आहे, असा आरोप विज्युक्टाचे डॉ. अविनाश बोर्डे यांनी केला. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गटनिहाय किमान तीन शिक्षक असावेत, याबाबत तातडीने निर्णय व्हावा, अशी आग्रही मागणी त्यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या निवेदनात केली आहे.

दरम्यान, उर्वरित वर्गाच्या परीक्षा मुल्यमापन व निकाल हे काम सुद्धा आहे. त्यामुळे शिक्षक-शिक्षकेतरांची समायोजन प्रक्रिया तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक पुणे यांना विज्युक्टाचे अध्यक्ष डाॅ. अविनाश बोर्डे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

परीक्षा कार्यात शिक्षक व्यस्त; समायोजन प्रक्रिया थांबवा

२०२४-२५ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांची जिल्हास्तरावर समायोजनाची कार्यवाही ३ मार्चपर्यंत, तर २५ मार्चपर्यंत विभाग स्तरावर कार्यवाही करण्याचे निर्देश संचालकांनी ४ फेब्रुवारीच्या पत्रान्वये दिले आहेत. राज्यात १० फेब्रुवारीपासून मंडळाच्या लेखी परीक्षा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा देखील सुरू आहेत. या सोबतच शिक्षकांना मंडळाच्या परीक्षांचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम विहीत वेळेत पूर्ण करावे लागेल.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.