Loading...
ब्रेकिंग न्यूज :
मुख्याध्यापक, केंद्र संचालक निलंबित राजा दख्खनचा श्री ज्योतिबा राजा मायेचा प्रेमळ स्पर्श... मानवतावादी विचारवंत डॉ. म. सु. पगारे यांचे गावासाठी ८६ हजाराचे ३८१ पुस्तकांचे दान जावळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत झेंडा उंचावला जि.प. च्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करणार काले येथील मुलांच्या शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरुरमध्ये मुलींची बाजी मारुल तर्फ पाटणच्या दुर्गम भागातील २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्याची मागणी, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद रेणुका कदम - चौधरी यांचे सीटीईटी परीक्षेत यश गळनिंब शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रकाश पाचपुतेंतर्फे पाणी बॉटल लिंब केंद्रातील १० शिक्षकांचे सीटीईटी परीक्षेत सुयश संघर्षाचा ज्ञानदीप : कृष्णा शंकर रोकडे इथे एप्रिल फुल तर रोजच होतो आहे !! शिक्षक घरी येऊन अॅडमिशन करून देणार मार्च ते जून दरम्यान शासनातर्फे जनजागृती राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय जेजुरीत ९९ वर्षांच्या आजोबांनी दिली 'नवभारत साक्षरता' परीक्षा सीटीईटी फेब्रुवारी २०१६ चा निकाल १५.६८ टक्के शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे ढोरेगाव शाळेत अत्याधुनिक स्टेम लॅब विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानातील रोमांचक सफर.. शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार रुग्णसेवेतील 'प्रतिभे'ची यशोगाथा तप्त धरती - तहानलेले प्राण शाळांमध्ये क्रीडा, कला शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण येणार, आशिष शेलार यांनी दिले संकेत नेवाशातील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरु केले वर्तमानपत्र वाचनालय समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार : डॉ. योगेश सुरवसे जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत शुभांगी भोसले यांचे यश रोहिणी औतडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : दीपक रोकडे शिरवळ मुले, मुलींच्या शाळेस भेट देऊन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले कौतुक काटेसावर इतिहासाच्या पाऊलखुणाः शोध की विस्मृती? शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची टीडीएफ संघटनेची मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे गुणपत्रक - प्रमाणपत्र आता एकाच वेळी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी पालकांना करमाफी होण्याची शक्यता हवेलीत 'शिक्षक सक्षमीकरण'चा जल्लोष लोणी काळभोरमध्ये स्पर्धा उत्साहात नवोदयसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा देवनांद्रा साकाप जि. प. शाळेत सत्कार जि. प. विद्यार्थ्यांनी काढला 'मुंबई अभ्यास दौरा' आमोंडीच्या संगीता वळसे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार बोपोर्डी शाळेच्या मुलांची आज सातारा आकाशवाणीवर 'धमाल' जत तालुका शिक्षक संघाकडून डॉ. सलगर, प्रा. हिप्परकर यांचा सत्कार मणेरी केंद्रातील १२ शाळांना पुण्याच्या 'उर्मी' कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप तर्कशुद्ध विचार करणं हे माणूस असण्याचं पहिलं लक्षण बुवाबाजी : संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आनंदाचं झाड बालसाहित्य पुरस्कार उत्तम सदाकाळ यांना प्रदान मुलाच्या वाढदिनी पालकांकडून कनेगाव शाळेला दिले पंखे भेट कन्नड तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा विशेष आनंद
Pune,Maharashtra,India

कार्यरत शिक्षकांना टीईटीत 15% गुणांची सवलत द्या

शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांची मागणी
कार्यरत शिक्षकांना टीईटीत 15% गुणांची सवलत द्या

 पुणे : राज्यातील सेवाज्येष्ठ व कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण होण्यासाठी गुणांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) यांच्या वतीने करण्यात आली आहे. शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले.

   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना दोन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने पदे भरण्याच्या प्रक्रियेतही टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे.

   राज्यातील पहिली ते आठवीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शासकीय व निमशासकीय शिक्षकांना टीईटी/सीटीईटी परीक्षा दोन वर्षांत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. तसेच मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी व विषय शिक्षक पदांवरील पदोन्नतीसाठीही ही अट लागू करण्यात आली आहे.

   सध्या अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व दिव्यांग प्रवर्गांसाठी उत्तीर्णतेसाठी ५ टक्के गुणांची सवलत देण्यात येते (किमान ५५% गुण आवश्यक). तर माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी व कुटुंबीयांसाठी १५ टक्के सवलत देऊन किमान ४५% गुणांची अट ठेवण्यात आली आहे.

   याच धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शिक्षण संस्थांमध्ये १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या सेवाजेष्ठ शिक्षकांना त्यांच्या वयाचा, मानसिकतेचा व अभ्यासक्रमातील बदलांचा विचार करून १५ टक्के गुणांची सवलत देण्यात यावी, म्हणजेच टीईटी/सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४५ टक्के गुणांची अट ठेवण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेकडून करण्यात आली आहे.

   या संदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष नंदकुमार बेडसे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून, याबाबत सकारात्मक भूमिका घेत उचित कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी दिली.

   या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष मनोज मराठे, अलिबाग शिक्षक पतपेढीचे विद्यमान चेअरमन निलेश साळवी, शिक्षक परिषदेचे मुरुड तालुका उपाध्यक्ष हेमकांत गोयजी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.