Loading...
ब्रेकिंग न्यूज :
आणखी एक बळी लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा तिसरीच्या बालभारती पुस्तकात समावेश जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला लोणंद मध्ये बेदम मारहाण युवकांनी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे करिअर घडवावे : जंबाजीराव भोसले कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू जनगणना बळीची मालिका सुरूच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनो भुलू नका...!! फाळणीच्या सावलीत कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण नीती आयोगाच्या शिफारशी अक्षयकुमारमुळे सरकारी शाळेचा कायापालट दिली एक कोटींची मदत जनगणना करताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू सांगोल्यातील राजेंद्र ढोले यांच्या निधनामुळे शोककळा जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले आजीचे प्राण, आजोबांचा मृत्यू
Satara,Maharashtra,India

प्रचंड गर्मीमुळे शाळांना सुट्टी ! तापमानात मोठी वाढ

विदर्भात उच्चांक, वर्ध्यात शाळा बंद
प्रचंड गर्मीमुळे शाळांना सुट्टी ! तापमानात मोठी वाढ

 नागपूर : मागील 48 तासांमध्ये राज्यात कुठंही पावसाची हजेरी नसून, उलटपक्षी उकाडा वाढल्याचं चित्र आहे. विदर्भातील अकोल्यात गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली.

तर, अमरावततीही पारा 44 अंशांवर पोहोचल्यानं आता हा आकडा हाफ सेंच्युरिपर्यंत जातोय का? हीच भीती व्यक्त केली जाच आहे. दरम्यान, उकाडा प्रचंड वाढत असल्याच्या धर्तीवर 16 एप्रिल 2026 रोजी वर्ध्यातील अंगणवाडी, प्राथमिक आणि मध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यादरम्यान तापमान 43 ते 45 अंशांदरम्यान असून उष्माघाताचा धोका वाढल्यानं प्रशासनानं सतर्कता बाळगली आहे.

शाळांना सुट्टी ...

वर्ध्यातील ही स्थिती विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर अपायकारक ठरु शकते. यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळांना एप्रिल रोजी सुटी जाहिर केली. हवामान विभागाने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार जिल्ह्यात 15 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट देण्यात आला होता. शिवाय वर्धा जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील दोन दिवसापासुन वर्धा जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाची तिव्रता वाढली असून अशा परिस्थितीत उष्मालाटेमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर, राज्यातील इतर जिल्हे आणि शहरांमध्येसुद्धा उष्णतेची तीव्रता पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आणि दुपारी 12 ते 4 या वेळेत गरज असल्यासच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. गरज नसल्यास घरातच थांबण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आला असून, यादरम्यान आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

विदर्भात होरपळ सुरू झालेली असतानाच कोकण, मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामान उष्ण आणि दमट असेल असा अंदाज आहे. उर्वरित राज्यात पारा चाळीशीपार गेला आहे. राज्यात उष्ण वाऱ्यांची स्थिती पाहता सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला आणि वर्धा इथं उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रावर पूर्वमोसमी पावसाचे ढग घोंगावतील असा इशारा जारी करण्यात आला आहे.

देशात रातोरात भयंकर हवामान बदल...

IMD च्या माहितीनुसार उत्तर भारतातही मागील 3 दिवसांपासून एकाएकी उकाडा वाला असून, सकाळपासूनच तीव्र सूर्यकिरणांमुळं अंगाची काहिली होताना दिसत आहे. अशा स्थितीत अतिशय महत्त्वाचा अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेसम स्थिती असून, याचा फटका मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशाला बसणार आहे. तर, दक्षिण भारतात हवामान अंशत: ढगाळ आणि दमट असेल. पूर्वोत्तर भारतात पावसाचं सत्र सुरूच राहणार आहे, ज्यामुळं तापमान नियंत्रणात राहील.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार 16 एप्रिल रोजी कमी तीव्रतेचा एक पश्चिमी झंझावात हिमालय क्षेत्रात प्रवेश करत आहे. ज्यामुळं जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांत हलका पाऊस, हिमवर्षावाची शक्यता आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.