Loading...
ब्रेकिंग न्यूज :
संघर्ष, मैत्री, शिक्षणसेवा आणि जिद्दीचा सुवर्णप्रवास - नितीन अशोक राजे सूर्य गिळणारी मी अकरावी-बारावी : शिक्षण की शिक्षेची सक्तमजुरी विद्यार्थी होणार 'एक दिवसाचा सरपंच' सोलापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात महाराष्ट्र देशात दुसरा समूह शाळेचा प्रस्ताव थंड बस्त्यात पचखेडी या एकमेव शाळेची निवड दिलीप चव्हाण यांचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सत्कार संभाजीनगर शाळेचे संतोष निकम यांना स्वराज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान जिल्हा परिषदेच्या २ शिक्षकांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू गट शिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांना महाराष्ट्र जनभूषण पुरस्कार प्रदान जि.प.च्या 2 शिक्षकांचा भीषण अपघातात मृत्यू आणखी एक बळी लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम
Jalgaon,Maharashtra,India

सर्वच पदोन्नतीसाठी 'टीईटी' ची अट

शासन आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये खळबळ
सर्वच पदोन्नतीसाठी 'टीईटी' ची अट

जळगाव : शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करत राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांसाठी आता टीईटी अत्यावश्यक अट राहणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील आदेश निर्गमित केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी त्याची माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र. १३८५/२०२५ मध्ये एक सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निकालात शिक्षक पात्रता परीक्षा ही गुणवत्ता व पात्रतेची मूलभूत अट असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनाने हा निर्णय अमलात आणला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, संबंधित शिक्षकांनी निकालाच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. या अटीला अधीन राहूनच पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. निर्णय घेण्यापूर्वी राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवले होते. विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतरच हा शासन आदेश अंतिम करण्यात आला आहे. त्यामुळे तो कायदेशीर चौकटीत आणि न्यायालयीन निर्देशांच्या अनुरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे.


नवे निकष 

नवीन शासन आदेशानुसार, टीईटी उत्तीर्णतेसह आवश्यक शैक्षणिक अर्हता, ठराविक सेवा कालावधी आणि इतर प्रशासकीय अटी, या सर्व निकषांची पूर्तता करणारे शिक्षक यापुढे पदोन्नतीस पात्र ठरतील. टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रियेत टीईटी पात्रतेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांनी टीईटी परीक्षेची तयारी सुरू करण्याचा विचार व्यक्त केला आहे. काही शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे; तर काहींनी दीर्घ सेवेनंतरही पदोन्नती अडथळ्यात येण्याची शक्यता व्यक्त करत नाराजी दर्शवली आहे.

शासनाच्या या नवीन निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात भविष्यात गुणवत्तेला सर्वाधिक महत्त्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रीय स्तरावरील मानकांशी सुसंगत राहून शिक्षकांची पात्रता निश्चित करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रिया अधिक पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि नियमाधारित होण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, टीईटीची अनिवार्यता हा शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा धोरणात्मक बदल असून, यामुळे शिक्षकांच्या सेवा नोंदी, कार्यमूल्यांकन आणि पदोन्नती प्रक्रियेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हा निर्णय निर्णायक ठरू शकतो.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.