Loading...
ब्रेकिंग न्यूज :
मुख्याध्यापक, केंद्र संचालक निलंबित राजा दख्खनचा श्री ज्योतिबा राजा मायेचा प्रेमळ स्पर्श... मानवतावादी विचारवंत डॉ. म. सु. पगारे यांचे गावासाठी ८६ हजाराचे ३८१ पुस्तकांचे दान जावळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत झेंडा उंचावला जि.प. च्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करणार काले येथील मुलांच्या शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरुरमध्ये मुलींची बाजी मारुल तर्फ पाटणच्या दुर्गम भागातील २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्याची मागणी, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद रेणुका कदम - चौधरी यांचे सीटीईटी परीक्षेत यश गळनिंब शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रकाश पाचपुतेंतर्फे पाणी बॉटल लिंब केंद्रातील १० शिक्षकांचे सीटीईटी परीक्षेत सुयश संघर्षाचा ज्ञानदीप : कृष्णा शंकर रोकडे इथे एप्रिल फुल तर रोजच होतो आहे !! शिक्षक घरी येऊन अॅडमिशन करून देणार मार्च ते जून दरम्यान शासनातर्फे जनजागृती राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय जेजुरीत ९९ वर्षांच्या आजोबांनी दिली 'नवभारत साक्षरता' परीक्षा सीटीईटी फेब्रुवारी २०१६ चा निकाल १५.६८ टक्के शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे ढोरेगाव शाळेत अत्याधुनिक स्टेम लॅब विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानातील रोमांचक सफर.. शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार रुग्णसेवेतील 'प्रतिभे'ची यशोगाथा तप्त धरती - तहानलेले प्राण शाळांमध्ये क्रीडा, कला शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण येणार, आशिष शेलार यांनी दिले संकेत नेवाशातील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरु केले वर्तमानपत्र वाचनालय समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार : डॉ. योगेश सुरवसे जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत शुभांगी भोसले यांचे यश रोहिणी औतडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : दीपक रोकडे शिरवळ मुले, मुलींच्या शाळेस भेट देऊन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले कौतुक काटेसावर इतिहासाच्या पाऊलखुणाः शोध की विस्मृती? शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची टीडीएफ संघटनेची मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे गुणपत्रक - प्रमाणपत्र आता एकाच वेळी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी पालकांना करमाफी होण्याची शक्यता हवेलीत 'शिक्षक सक्षमीकरण'चा जल्लोष लोणी काळभोरमध्ये स्पर्धा उत्साहात नवोदयसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा देवनांद्रा साकाप जि. प. शाळेत सत्कार जि. प. विद्यार्थ्यांनी काढला 'मुंबई अभ्यास दौरा' आमोंडीच्या संगीता वळसे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार बोपोर्डी शाळेच्या मुलांची आज सातारा आकाशवाणीवर 'धमाल' जत तालुका शिक्षक संघाकडून डॉ. सलगर, प्रा. हिप्परकर यांचा सत्कार मणेरी केंद्रातील १२ शाळांना पुण्याच्या 'उर्मी' कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप तर्कशुद्ध विचार करणं हे माणूस असण्याचं पहिलं लक्षण बुवाबाजी : संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आनंदाचं झाड बालसाहित्य पुरस्कार उत्तम सदाकाळ यांना प्रदान मुलाच्या वाढदिनी पालकांकडून कनेगाव शाळेला दिले पंखे भेट कन्नड तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा विशेष आनंद
Jalgaon,Maharashtra,India

सर्वच पदोन्नतीसाठी 'टीईटी' ची अट

शासन आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये खळबळ
सर्वच पदोन्नतीसाठी 'टीईटी' ची अट

जळगाव : शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करत राज्य शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक केले आहे. पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी या पदांसाठी आता टीईटी अत्यावश्यक अट राहणार आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या संदर्भातील आदेश निर्गमित केल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी त्याची माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने सिव्हील अपील क्र. १३८५/२०२५ मध्ये एक सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निकालात शिक्षक पात्रता परीक्षा ही गुणवत्ता व पात्रतेची मूलभूत अट असल्याचे स्पष्ट केले होते. त्या अनुषंगाने राज्य शासनाने हा निर्णय अमलात आणला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार, संबंधित शिक्षकांनी निकालाच्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. या अटीला अधीन राहूनच पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. निर्णय घेण्यापूर्वी राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद तसेच केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडे मार्गदर्शन मागवले होते. विधी व न्याय विभागाच्या अभिप्रायानंतरच हा शासन आदेश अंतिम करण्यात आला आहे. त्यामुळे तो कायदेशीर चौकटीत आणि न्यायालयीन निर्देशांच्या अनुरूप असल्याचे स्पष्ट झाले आहे.


नवे निकष 

नवीन शासन आदेशानुसार, टीईटी उत्तीर्णतेसह आवश्यक शैक्षणिक अर्हता, ठराविक सेवा कालावधी आणि इतर प्रशासकीय अटी, या सर्व निकषांची पूर्तता करणारे शिक्षक यापुढे पदोन्नतीस पात्र ठरतील. टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रियेत टीईटी पात्रतेला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षकांनी टीईटी परीक्षेची तयारी सुरू करण्याचा विचार व्यक्त केला आहे. काही शिक्षकांनी गुणवत्ता वाढीसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे; तर काहींनी दीर्घ सेवेनंतरही पदोन्नती अडथळ्यात येण्याची शक्यता व्यक्त करत नाराजी दर्शवली आहे.

शासनाच्या या नवीन निर्णयामुळे शिक्षण क्षेत्रात भविष्यात गुणवत्तेला सर्वाधिक महत्त्व दिले जाणार असल्याचे स्पष्ट होते. राष्ट्रीय स्तरावरील मानकांशी सुसंगत राहून शिक्षकांची पात्रता निश्चित करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागातील पदोन्नती प्रक्रिया अधिक पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि नियमाधारित होण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकंदरीत, टीईटीची अनिवार्यता हा शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वाचा धोरणात्मक बदल असून, यामुळे शिक्षकांच्या सेवा नोंदी, कार्यमूल्यांकन आणि पदोन्नती प्रक्रियेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. भविष्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी हा निर्णय निर्णायक ठरू शकतो.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.