Loading...
ब्रेकिंग न्यूज :
मुख्याध्यापक, केंद्र संचालक निलंबित राजा दख्खनचा श्री ज्योतिबा राजा मायेचा प्रेमळ स्पर्श... मानवतावादी विचारवंत डॉ. म. सु. पगारे यांचे गावासाठी ८६ हजाराचे ३८१ पुस्तकांचे दान जावळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत झेंडा उंचावला जि.प. च्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करणार काले येथील मुलांच्या शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरुरमध्ये मुलींची बाजी मारुल तर्फ पाटणच्या दुर्गम भागातील २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्याची मागणी, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद रेणुका कदम - चौधरी यांचे सीटीईटी परीक्षेत यश गळनिंब शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रकाश पाचपुतेंतर्फे पाणी बॉटल लिंब केंद्रातील १० शिक्षकांचे सीटीईटी परीक्षेत सुयश संघर्षाचा ज्ञानदीप : कृष्णा शंकर रोकडे इथे एप्रिल फुल तर रोजच होतो आहे !! शिक्षक घरी येऊन अॅडमिशन करून देणार मार्च ते जून दरम्यान शासनातर्फे जनजागृती राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय जेजुरीत ९९ वर्षांच्या आजोबांनी दिली 'नवभारत साक्षरता' परीक्षा सीटीईटी फेब्रुवारी २०१६ चा निकाल १५.६८ टक्के शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे ढोरेगाव शाळेत अत्याधुनिक स्टेम लॅब विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानातील रोमांचक सफर.. शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार रुग्णसेवेतील 'प्रतिभे'ची यशोगाथा तप्त धरती - तहानलेले प्राण शाळांमध्ये क्रीडा, कला शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण येणार, आशिष शेलार यांनी दिले संकेत नेवाशातील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरु केले वर्तमानपत्र वाचनालय समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार : डॉ. योगेश सुरवसे जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत शुभांगी भोसले यांचे यश रोहिणी औतडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : दीपक रोकडे शिरवळ मुले, मुलींच्या शाळेस भेट देऊन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले कौतुक काटेसावर इतिहासाच्या पाऊलखुणाः शोध की विस्मृती? शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची टीडीएफ संघटनेची मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे गुणपत्रक - प्रमाणपत्र आता एकाच वेळी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी पालकांना करमाफी होण्याची शक्यता हवेलीत 'शिक्षक सक्षमीकरण'चा जल्लोष लोणी काळभोरमध्ये स्पर्धा उत्साहात नवोदयसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा देवनांद्रा साकाप जि. प. शाळेत सत्कार जि. प. विद्यार्थ्यांनी काढला 'मुंबई अभ्यास दौरा' आमोंडीच्या संगीता वळसे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार बोपोर्डी शाळेच्या मुलांची आज सातारा आकाशवाणीवर 'धमाल' जत तालुका शिक्षक संघाकडून डॉ. सलगर, प्रा. हिप्परकर यांचा सत्कार मणेरी केंद्रातील १२ शाळांना पुण्याच्या 'उर्मी' कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप तर्कशुद्ध विचार करणं हे माणूस असण्याचं पहिलं लक्षण बुवाबाजी : संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आनंदाचं झाड बालसाहित्य पुरस्कार उत्तम सदाकाळ यांना प्रदान मुलाच्या वाढदिनी पालकांकडून कनेगाव शाळेला दिले पंखे भेट कन्नड तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा विशेष आनंद
New Delhi,India

'टीईटीग्रस्त' शिक्षकांना केंद्राचा दिलासा

सरकारच्या पावलांनी लाखो शिक्षकांच्या आशा पल्लवित
'टीईटीग्रस्त' शिक्षकांना केंद्राचा दिलासा

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य करण्याबाबत दिलेल्या निर्णयानंतर देशभरातील लाखो प्राथमिक शिक्षकांच्या नोकरीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक वर्षांपासून शाळांमध्ये शिकवत असलेले, मात्र टीईटी उत्तीर्ण न झालेले शिक्षक सध्या प्रचंड तणावाखाली आहेत.
एकीकडे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी आणि दुसरीकडे स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी परीक्षेची तयारी, अशा दुहेरी कात्रीत हे शिक्षक सापडले आहेत.
टीईटी सक्तीला सूट द्यावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून देशभरातील सेवेत असलेले शिक्षक, विविध शिक्षक संघटना आणि काही लोकप्रतिनिधी केंद्र सरकारकडे सातत्याने निवेदने देत होते. अनेक ठिकाणी आंदोलन, धरणे आणि निदर्शनेही झाली. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने या प्रकरणात सक्रिय भूमिका घेतली आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने सर्व राज्य सरकारांकडून 2011 पूर्वी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत नियुक्त झालेल्या शिक्षकांची सविस्तर माहिती मागवली आहे. ही माहिती 16 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात 31 डिसेंबर रोजीच सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या या हालचालीमुळे देशातील सुमारे 12 लाख शिक्षकांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कोणते शिक्षक प्रभावित होऊ शकतात, याचा अचूक तपशील राज्य सरकारांकडून मागवण्यात आला आहे.
उत्तर प्रदेशातच सुमारे 1.86 लाख शिक्षक असे आहेत, ज्यांनी अद्याप टीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेली नाही. यामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीपर्यंत शिकवणारे शिक्षक, त्यांची शैक्षणिक पात्रता, प्रशिक्षण, तसेच वयोगटानुसार सविस्तर वर्गीकरणाची माहिती मागितली आहे. 21 ते 25, 26 ते 30, 31 ते 35, 36 ते 40, 41 ते 45, 46 ते 50, 51 ते 55, 56 ते 60 आणि 60 वर्षांवरील शिक्षकांची स्वतंत्र माहिती द्यावी लागणार आहे.
याशिवाय केंद्र सरकारने राज्यांना काही महत्त्वाचे प्रश्नही विचारले आहेत. 2011 मध्ये एनसीटीईने जारी केलेल्या अधिसूचनेपूर्वी किती शिक्षकांची नियुक्ती झाली, 2011 नंतर किती नियुक्त्या झाल्या, तसेच 2011 पूर्वीच सीटीईटी किंवा टीईटी उत्तीर्ण शिक्षकांची संख्या किती, याचा तपशील द्यावा लागणार आहे.
या शिक्षकांना दिलासा देण्यासाठी कायदेशीर किंवा धोरणात्मक पातळीवर कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतात, याबाबत राज्य सरकारांनी आपली स्पष्ट भूमिका मांडावी, असेही केंद्राने सांगितले आहे.
दरम्यान, 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत यंदा वेगळे चित्र दिसणार आहे. सेवेत असलेल्या शिक्षकांसाठीही टीईटी अनिवार्य झाल्याने यावेळी विक्रमी 25 लाखांहून अधिक अर्ज आले आहेत.
विविध राज्यांमध्ये या निर्णयाचा मोठा परिणाम दिसून येत असून, उत्तर प्रदेशात 1.86 लाख, राजस्थानात सुमारे 80 हजार, मध्य प्रदेशात सुमारे 3 लाख तर झारखंडमध्ये हजारो शिक्षक या निर्णयामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकार पुढे काय निर्णय घेते, याकडे देशभरातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.