Loading...
ब्रेकिंग न्यूज :
संघर्ष, मैत्री, शिक्षणसेवा आणि जिद्दीचा सुवर्णप्रवास - नितीन अशोक राजे सूर्य गिळणारी मी अकरावी-बारावी : शिक्षण की शिक्षेची सक्तमजुरी विद्यार्थी होणार 'एक दिवसाचा सरपंच' सोलापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात महाराष्ट्र देशात दुसरा समूह शाळेचा प्रस्ताव थंड बस्त्यात पचखेडी या एकमेव शाळेची निवड दिलीप चव्हाण यांचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सत्कार संभाजीनगर शाळेचे संतोष निकम यांना स्वराज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान जिल्हा परिषदेच्या २ शिक्षकांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू गट शिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांना महाराष्ट्र जनभूषण पुरस्कार प्रदान जि.प.च्या 2 शिक्षकांचा भीषण अपघातात मृत्यू आणखी एक बळी लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम
A.Nagar,Maharashtra,India

अहिल्यानगरात 11 शिक्षक निलंबित,

अपंगत्वाचे प्रमाण आढळले कमी, शिक्षण क्षेत्रात खळबळ
अहिल्यानगरात 11 शिक्षक निलंबित,

अहिल्यानगर : जिल्हा सरकारी रुग्णालयाने केलेल्या पडताळणीत अपंगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळलेल्या जिल्हा परिषदेच्या १५ कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

यामध्ये ११ शिक्षक, ३ शिपाई (परिचर) व १ आरोग्य सेवकाचा समावेश आहे. यातील ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेशही त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळवण्याचे विविध विभागातील प्रकरणे गाजत आहेत. याच साखळीतील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. इतर विभाग कोणती भूमिका घेतात याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. काही वर्षांपूर्वी अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राचा आधारे बदली अथवा सरकारी सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्या तब्बल ७८ प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण अद्यापि न्यायालयीन प्रक्रियेत आहे. आता आणखी १५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारने सर्व सरकारी विभागातील अपंग कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने तालुकानिहाय शिबिरे घेऊन अपंग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय पडताळणी केली. जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५४५ विविध प्रकारचे अपंग कर्मचारी आहेत. त्यामध्ये सकृतदर्शनी १८० कर्मचारी अपंग असल्याचे आढळले. उर्वरित कर्मचाऱ्यांची पडताळणी जिल्हा सरकारी रुग्णालयामार्फत करण्यात आली. त्यामध्ये १८ कर्मचाऱ्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र ४० टक्क्यापेक्षा कमी आढळले. तसा अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा परिषदेला पाठवला. १९ कर्मचारी वैद्यकीय पडताळणीसाठी गैरहजर राहिले होते. अशा सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. यातील १५ जणांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश आज देण्यात आले आहेत. यातील एकाचा खुलासा मान्य करण्यात आला आहे तर एकाची पुन्हा पडताळणी करण्यात आले आहे. एका खुलाशाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या १९ कर्मचाऱ्यांची अपंग विभागाच्या उपसंचालक कार्यालयामार्फत पडताळणी केली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निलंबन कारवाई झालेले कर्मचारी

१) समाधान कचरू घुगे (आरोग्य सेवक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), २) सुनील दत्तात्रय वाघ (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ३) प्रभाकर संतु चोखंडे (परिचर, अस्थिभंग), ४) दत्तात्रय आनंदराव फपाळे (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ५) वामन जगन्नाथ घाटपांडे (परिचर अस्थिव्यंग, कायदेशीर कारवाई), ६) अतुल तुकाराम सातपुते (परिचर, अस्थिव्यंग), ७) मंदा तुकाराम शिंदे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ८) संगीता विजय कदम (शिक्षक, अस्थिभंग), ९) संजयकुमार विश्वनाथ बडे (शिक्षक, अस्थिभंग), १०) वर्षा त्र्यंबक अकोलकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ११) पुष्पलता दिनकर खेडकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १२) सतीश मोहन लगड (शिक्षक, अस्थिव्यंग), १३) सागर रेवजी मोरे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १४) विनायककुमार मगन वाडेकर (शिक्षक, अल्पदृष्टी, कायदेशीर कारवाई) व १५) संतोष हिरामण लष्करे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई )


आणखी १९ कर्मचाऱ्यांची तपासणी

जिल्हा परिषदेच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त झाले व त्यांनी नोकरीसाठी त्याचा लाभ घेतला अशा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी बदली किंवा इतर सरकारी सवलतींचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय इतर १९ जणांची पडताळणी उपसंचालक कार्यालयामार्फत केली जाणार आहे. 

आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.