Loading...
ब्रेकिंग न्यूज :
राजा दख्खनचा श्री ज्योतिबा राजा मायेचा प्रेमळ स्पर्श... मानवतावादी विचारवंत डॉ. म. सु. पगारे यांचे गावासाठी ८६ हजाराचे ३८१ पुस्तकांचे दान जावळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत झेंडा उंचावला जि.प. च्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करणार काले येथील मुलांच्या शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरुरमध्ये मुलींची बाजी मारुल तर्फ पाटणच्या दुर्गम भागातील २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्याची मागणी, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद रेणुका कदम - चौधरी यांचे सीटीईटी परीक्षेत यश गळनिंब शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रकाश पाचपुतेंतर्फे पाणी बॉटल लिंब केंद्रातील १० शिक्षकांचे सीटीईटी परीक्षेत सुयश संघर्षाचा ज्ञानदीप : कृष्णा शंकर रोकडे इथे एप्रिल फुल तर रोजच होतो आहे !! शिक्षक घरी येऊन अॅडमिशन करून देणार मार्च ते जून दरम्यान शासनातर्फे जनजागृती राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय जेजुरीत ९९ वर्षांच्या आजोबांनी दिली 'नवभारत साक्षरता' परीक्षा सीटीईटी फेब्रुवारी २०१६ चा निकाल १५.६८ टक्के शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे ढोरेगाव शाळेत अत्याधुनिक स्टेम लॅब विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानातील रोमांचक सफर.. शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार रुग्णसेवेतील 'प्रतिभे'ची यशोगाथा तप्त धरती - तहानलेले प्राण शाळांमध्ये क्रीडा, कला शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण येणार, आशिष शेलार यांनी दिले संकेत नेवाशातील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरु केले वर्तमानपत्र वाचनालय समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार : डॉ. योगेश सुरवसे जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत शुभांगी भोसले यांचे यश रोहिणी औतडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : दीपक रोकडे शिरवळ मुले, मुलींच्या शाळेस भेट देऊन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले कौतुक काटेसावर इतिहासाच्या पाऊलखुणाः शोध की विस्मृती? शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची टीडीएफ संघटनेची मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे गुणपत्रक - प्रमाणपत्र आता एकाच वेळी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी पालकांना करमाफी होण्याची शक्यता हवेलीत 'शिक्षक सक्षमीकरण'चा जल्लोष लोणी काळभोरमध्ये स्पर्धा उत्साहात नवोदयसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा देवनांद्रा साकाप जि. प. शाळेत सत्कार जि. प. विद्यार्थ्यांनी काढला 'मुंबई अभ्यास दौरा' आमोंडीच्या संगीता वळसे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार बोपोर्डी शाळेच्या मुलांची आज सातारा आकाशवाणीवर 'धमाल' जत तालुका शिक्षक संघाकडून डॉ. सलगर, प्रा. हिप्परकर यांचा सत्कार मणेरी केंद्रातील १२ शाळांना पुण्याच्या 'उर्मी' कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप तर्कशुद्ध विचार करणं हे माणूस असण्याचं पहिलं लक्षण बुवाबाजी : संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आनंदाचं झाड बालसाहित्य पुरस्कार उत्तम सदाकाळ यांना प्रदान मुलाच्या वाढदिनी पालकांकडून कनेगाव शाळेला दिले पंखे भेट कन्नड तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा विशेष आनंद ICT विषय मान्य, पदे मंजूर.. तरीही शिक्षक नाहीत, डिजिटल शिक्षणात मोठा विरोधाभास
A.Nagar,Maharashtra,India

अहिल्यानगरात 11 शिक्षक निलंबित,

अपंगत्वाचे प्रमाण आढळले कमी, शिक्षण क्षेत्रात खळबळ
अहिल्यानगरात 11 शिक्षक निलंबित,

अहिल्यानगर : जिल्हा सरकारी रुग्णालयाने केलेल्या पडताळणीत अपंगत्वाचे प्रमाण ४० टक्क्यांपेक्षा कमी आढळलेल्या जिल्हा परिषदेच्या १५ कर्मचाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

यामध्ये ११ शिक्षक, ३ शिपाई (परिचर) व १ आरोग्य सेवकाचा समावेश आहे. यातील ८ जणांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेशही त्यांनी संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना त्यांनी दिले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकऱ्या मिळवण्याचे विविध विभागातील प्रकरणे गाजत आहेत. याच साखळीतील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. इतर विभाग कोणती भूमिका घेतात याकडे सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. काही वर्षांपूर्वी अपंगत्वाच्या बनावट प्रमाणपत्राचा आधारे बदली अथवा सरकारी सवलतींचा गैरफायदा घेणाऱ्या तब्बल ७८ प्राथमिक शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हे प्रकरण अद्यापि न्यायालयीन प्रक्रियेत आहे. आता आणखी १५ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

राज्य सरकारने सर्व सरकारी विभागातील अपंग कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय पडताळणीचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेने तालुकानिहाय शिबिरे घेऊन अपंग कर्मचाऱ्यांची वैद्यकीय पडताळणी केली. जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५४५ विविध प्रकारचे अपंग कर्मचारी आहेत. त्यामध्ये सकृतदर्शनी १८० कर्मचारी अपंग असल्याचे आढळले. उर्वरित कर्मचाऱ्यांची पडताळणी जिल्हा सरकारी रुग्णालयामार्फत करण्यात आली. त्यामध्ये १८ कर्मचाऱ्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र ४० टक्क्यापेक्षा कमी आढळले. तसा अहवाल जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्य चिकित्सकांनी जिल्हा परिषदेला पाठवला. १९ कर्मचारी वैद्यकीय पडताळणीसाठी गैरहजर राहिले होते. अशा सर्व कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नोटीस पाठवून खुलासा मागवला होता. यातील १५ जणांचा खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचे आदेश आज देण्यात आले आहेत. यातील एकाचा खुलासा मान्य करण्यात आला आहे तर एकाची पुन्हा पडताळणी करण्यात आले आहे. एका खुलाशाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. याशिवाय पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्या १९ कर्मचाऱ्यांची अपंग विभागाच्या उपसंचालक कार्यालयामार्फत पडताळणी केली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

निलंबन कारवाई झालेले कर्मचारी

१) समाधान कचरू घुगे (आरोग्य सेवक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), २) सुनील दत्तात्रय वाघ (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ३) प्रभाकर संतु चोखंडे (परिचर, अस्थिभंग), ४) दत्तात्रय आनंदराव फपाळे (मुख्याध्यापक, कर्णबधिर), ५) वामन जगन्नाथ घाटपांडे (परिचर अस्थिव्यंग, कायदेशीर कारवाई), ६) अतुल तुकाराम सातपुते (परिचर, अस्थिव्यंग), ७) मंदा तुकाराम शिंदे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ८) संगीता विजय कदम (शिक्षक, अस्थिभंग), ९) संजयकुमार विश्वनाथ बडे (शिक्षक, अस्थिभंग), १०) वर्षा त्र्यंबक अकोलकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), ११) पुष्पलता दिनकर खेडकर (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १२) सतीश मोहन लगड (शिक्षक, अस्थिव्यंग), १३) सागर रेवजी मोरे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई), १४) विनायककुमार मगन वाडेकर (शिक्षक, अल्पदृष्टी, कायदेशीर कारवाई) व १५) संतोष हिरामण लष्करे (शिक्षक, कर्णबधिर, कायदेशीर कारवाई )


आणखी १९ कर्मचाऱ्यांची तपासणी

जिल्हा परिषदेच्या ज्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी अपंगत्वाचे प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त झाले व त्यांनी नोकरीसाठी त्याचा लाभ घेतला अशा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी बदली किंवा इतर सरकारी सवलतींचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय इतर १९ जणांची पडताळणी उपसंचालक कार्यालयामार्फत केली जाणार आहे. 

आनंद भंडारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहिल्यानगर.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.