Loading...
ब्रेकिंग न्यूज :
जि. प. शाळा करगणी क्रमांक २ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी मोडनिंब पीएमश्री मुलींच्या शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी गुरूंचे आशीर्वाद आपल्यासाठी लाखमोलाचे : प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोबडे बेलसरच्या कल्याणी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी नवनियुक्त शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांचा हॅप्पी टू हेल्प फाउंडेशनतर्फ सत्कार काळमवाडी जिल्हा परिषद शाळेचा पर्यावरणासाठी अनोखा संकल्प आजारी होण्यापूर्वीच आरोग्य जपण्याची गरज विनाशाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाला विवेकाचा इशारा 'बाराला दहा कमी' एसआयआरसाठी शिक्षक आणखी पाच दिवस शाळेबाहेर राहणार समग्र शिक्षा अभियानात महाराष्ट्राला तुटपुंजा निधी शिक्षणमंत्री दादा भुसेंची केंद्र सरकारवर नाराजी पालकांनी विश्वासू मार्गदर्शक व्हावे : डॉ. मंजुश्री बोबडे 'वायसी'त पालक मेळावा उत्साहात सायबर व विद्यार्थी सुरक्षेबाबत पाटण पोलिसांचे ज्ञानोजीराव हायस्कुलमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आदर्श विद्यालय शिरवळ येथे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी संभाजीनगर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांना पिंपोडे खुर्द ग्रामस्थांची सदिच्छा भेट शिष्यवृत्ती, मंथन, प्रज्ञाशोध परीक्षांमध्ये म्हसवे जि.प. शाळेची यशस्वी परंपरा एक सूर, एक ताल अभिनव संकल्पनेतून अतीत केंद्रातील विद्यार्थ्यांना एकसमान गणवेश ज्ञानदानाचा अखंड दीप - आदर्श शिक्षण नसिम सादिक तांबोळी स्त्रीविषयक जाणिवांचा धगधगता वास्तव आलेख - भूमिकन्या वाढलेल्या पटसंख्येमुळे शिक्षक कमी न करण्याची शिक्षक संघाची मागणी शिक्षक मित्र विचार मंचची उरमोडी परिक्रमा उत्साहात पदोन्नती प्राप्त शिक्षक, शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा भाटशिरपुरा शाळेत गौरव शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरुज शाळेत गौरव शिक्षक परिषदेच्या बहुतांश मागण्या शिक्षणमंत्र्यांकडून मान्य बेलदरे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून सीडबॉल रोपणाचा अभिनव उपक्रम एक पेड माँ के नाम अभियानाला ढोरेगावच्या जि.प. शाळेचा हरित स्पर्श विद्यानगर जि.प. प्राथमिक शाळेत नवभारत साक्षरता ग्रंथदिंडी उत्साहात गुरुपौर्णिमा अज्ञानातून ज्ञानप्रकाशाकडे नेणाऱ्या गुरुतत्त्वाचा उत्सव गुरु दक्षिणेच्या पलीकडील गुरुत्व अभिनव विद्याविहार प्राथमिक शाळेच्या पाच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश जतपुरा शाळेचे अमोल आढळकर यांचा स्टार प्रवाहकडून विशेष गौरव उज्ज्वल भविष्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही : डॉ. चंद्रकांत पाटील आरटीई कायद्यात दुरुस्ती करून सेवेतील शिक्षकांना टीईटी मधून कायमस्वरूपी सूट द्यावी : शेख अब्दुल रहीम चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत देवनांद्रा शाळेची यशाची परंपरा कायम राज्यस्तरीय शिक्षण संवाद कार्यशाळा मुंबई येथे उत्साहात संपन्न आषाढी एकादशीनिमित्त जि.प. च्या गळनिंब शाळेत भक्तिमय बालदिंडी सांगली शिक्षक बँकेत भरतीवरुन घमासान गुरु पौर्णिमा म्हणजे कृतज्ञतेचा दिवस... गुरु पौर्णिमा ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा पवित्र उत्सव नीट परीक्षेत ६२५ गुण मिळविणाऱ्या उत्कर्ष राक्षेला लक्ष्य अकॅडमीकडून हार्ले डेव्हिडसन मोटारसायकल भेट लोकमंगल शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना सनराईज ग्रुपकडून मोफत गणवेश वाटप झेप प्रतिष्ठानतर्फे रुईघर, शिंदेवाडी शाळांना संगणक, शैक्षणिक साहित्याचे वितरण शिरगाव आदर्श प्राथमिक शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत देदिप्यमान यश श्री भवानी बालविद्या मंदिराची उत्साहपूर्ण आषाढी बालदिंडी ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात हेकळवाडी शाळेत बालवारकऱ्यांची दिंडी टाके वस्ती शाळेच्या दिंडीतून पर्यावरण, सामाजिक जनजागृती वाई तालुका शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारिणीची घोषणा इयत्ता ६ वी ते ८ वीच्या शाळांनाही २० पटासाठी तीन शिक्षक मंजूर व्हावेत भक्तिरसात न्हाऊन निघाले रांजणगाव पोळ कानेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संगमनेर नगरपालिका शाळा क्र. ८ मध्ये भारतीय भाषा शिबिराचा उत्साहात समारोप
Satara,Maharashtra,India

बनावट अपंग कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास

तुकाराम मुंढे यांची बदली आणि न्यायालयाच्या निर्णयाचा फटका
बनावट अपंग कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास

मुंबई : अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकऱ्या पटकावलेल्या कर्मचाऱ्यांवरील कारवाईला आता थांबा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची अचानक झालेली बदली आणि कर्मचाऱ्यांचा सरकारवरचा दबाव याला कारणीभूत ठरला आहे.

आश्चर्य म्हणजे दिव्यांग सक्षमीकरण विभागाला अपंग कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालये आणि शासनाच्या सर्व विभागांनी चक्क टाळाटाळ चालवली आहे.

तुकाराम मुंढे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव असताना ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शासकीय कार्यालयातील सर्वच सरसकट अपंग कर्मचऱ्यांच्या पुनर्तपासणीचा शासन निर्णय जारी झाला होता. शासनाचे 'अ' ते 'ड' वर्गातील ७, २८, ९९३ कर्मचारी आहेत. पैकी ६,९०९ कर्मचारी अपंग आहेत. अपंगांना सरळसेवेत ४ टक्के आरक्षण आहे. मात्र अपंगांचे शासकीय सेवेतील प्रमाण अवघे १.४ टक्के आहे. त्यातही बनावट प्रमाणपत्र व ४० टक्केच्या आत अपंगत्व असणाऱ्यांनी या जागा पटकावल्या आहेत.

बनाटव अपंग कर्मचाऱ्यांची बहुतांश भरती स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आहे. दिव्यांग सक्षमीकरण विभागाने याससंदर्भातली माहिती मागवली होती. त्यामध्ये ३४ जिल्हा परिषदांमध्ये ११,७५९ अपंग कर्मचारी असून बनावट प्रमाणपत्र व ४० टक्केच्या आत अपंगत्व असलेले ३७५ कर्मचारी आढळले.

राज्यात ३६ जिल्हे आहेत, मात्र १२ जिल्हाधिकारी कार्यालयांनी माहिती सादर केली. त्यामध्ये ५५२ अपंग कर्मचाऱ्यांपैकी १ कर्मचारी बोगस आढळला आहे. २९ महानगरपालिकापैकी १० महापालिकांनी अपंग कर्मचाऱ्यांची माहिती सादर केली असून १६१६ अपंग कर्मचाऱ्यांमध्ये २ बोगस अपंग कर्मचारी आढळून आले आहेत.

निवृत्त झालेल्या बोगस अपंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करु नका, बोगस अपंग कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय द्या आणि ४० टक्केच्या आत अपंगत्व असलेल्यांना पुढचे लाभ थांबवा, असे ६ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा फटका तुकाराम मुंढे यांनी सुरु केलेल्या अपंग कर्मचाऱ्यांच्या सरसकट पडताळणीला बसला आहे.

दरम्यान मुंढे यांची सहा महिन्यात येथून बदली झाली आणि त्यांच्या जागी माणिक गुरसळ सचिवपदी आले. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे मंत्री भाजपचे अतुल सावे आहेत. सरकारने अपंग कर्मचाऱ्यांच्या सरसकट पडताळणीला आता ब्रेक लावल्याने हजारो बोगस अपंग कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अपंग कर्मचाऱ्यांची पडताळणी प्रक्रिया कायदेशीर, वैद्यकीय आणि नियबद्ध पद्धतीने होईल. मात्र न्यायालयाच्या निकालावर आपण बोलू शकत नाही, असे दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव माणिक गुरसळ यांचे म्हणणे आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.