Loading...
ब्रेकिंग न्यूज :
संघर्ष, मैत्री, शिक्षणसेवा आणि जिद्दीचा सुवर्णप्रवास - नितीन अशोक राजे सूर्य गिळणारी मी अकरावी-बारावी : शिक्षण की शिक्षेची सक्तमजुरी विद्यार्थी होणार 'एक दिवसाचा सरपंच' सोलापूर जिल्हा परिषदेचा उपक्रम राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारात महाराष्ट्र देशात दुसरा समूह शाळेचा प्रस्ताव थंड बस्त्यात पचखेडी या एकमेव शाळेची निवड दिलीप चव्हाण यांचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सत्कार संभाजीनगर शाळेचे संतोष निकम यांना स्वराज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान जिल्हा परिषदेच्या २ शिक्षकांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू गट शिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांना महाराष्ट्र जनभूषण पुरस्कार प्रदान जि.प.च्या 2 शिक्षकांचा भीषण अपघातात मृत्यू आणखी एक बळी लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम
Ratnagiri,Maharashtra,India

जिल्ह्यात १,४९७ शिक्षक 'अतिरिक्त'

संचमान्यतेचा फटका, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण
जिल्ह्यात १,४९७ शिक्षक 'अतिरिक्त'

रत्नागिरी, देवरूख : राज्याच्या शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या संचमान्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात मोठी उलथापालथ झाली असून तब्बल 1, 497 शिक्षक अतिरिक्त ठरल्याचे वृत्त सकाळ ने दिले आहे. 

पटसंख्येचा नवा निकष आणि आधारकार्ड लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांमुळे जिल्ह्यातील १ हजार १७ प्राथमिक तर ४८० माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात विद्यार्थी नोंदणीचे काम अत्यंत प्रभावीपणे झाले असून, ९८ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. केवळ २ टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी तांत्रिक कारणांमुळे किंवा आधार त्रुटींमुळे प्रलंबित आहे; मात्र नियमानुसार संचमान्यतेसाठी केवळ प्रमाणित (व्हॅलिड) विद्यार्थीच ग्राह्य धरले जातात.

हा मुद्दाही शिक्षक अतिरिक्त होण्यासाठी कारण ठरला आहे. इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आधार नोंदणीचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान असताना रत्नागिरीने ९८ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करूनही, १ हजार ०१७ प्राथमिक आणि ४८० माध्यमिक असे एकूण १ हजार ४९७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

जिल्ह्यातील ६ वी ते ८ वीच्या शाळांमधील पटसंख्या कारणीभूत ठरली आहे. १९ पटापर्यंत एक पदवीधर शिक्षक मंजूर असल्यामुळे मोठ्याप्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. पटसंख्या केवळ १०-२० ने कमी भरली, तरी पूर्णवेळ शिक्षकाचे पद कमी होत असल्याने शाळांचे प्रशासकीय गणित पूर्णपणे बिघडणार आहे.

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आता रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये सामावून घेण्याची (समायोजन) प्रक्रिया राबवावी लागणार आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकसंख्या कमी झाल्याने एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या गंभीर प्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेऊन एकही शिक्षक जिल्ह्याबाहेर जाणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सध्या जिल्ह्यात समायोजन प्रक्रिया सुरू आहे.


अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांवर तात्पुरता मार्ग

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या समस्येवर सध्या तात्पुरता मार्ग काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिकच्या ९७० पदवीधर शिक्षकांना रिक्त शाळांमध्ये उपशिक्षकांऐवजी नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. तसेच सध्या जिल्ह्याबाहेर बदलीचा विषय काहीकाळ लांबणार आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्याबाहेर न करता जिल्ह्यातच करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शिक्षकांवर ओढवलेले विस्थापनाचे संकट टळले असून, यामुळे शिक्षकांना कौटुंबिक आणि मानसिक स्थैर्य लाभेल.

- दिलीप देवळेकर, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.