Loading...
ब्रेकिंग न्यूज :
राजा दख्खनचा श्री ज्योतिबा राजा मायेचा प्रेमळ स्पर्श... मानवतावादी विचारवंत डॉ. म. सु. पगारे यांचे गावासाठी ८६ हजाराचे ३८१ पुस्तकांचे दान जावळवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत झेंडा उंचावला जि.प. च्या सर्व शाळांमध्ये सेमी इंग्रजी सुरू करणार काले येथील मुलांच्या शाळेत शाळा पूर्वतयारी कार्यक्रम संपन्न सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत शिरुरमध्ये मुलींची बाजी मारुल तर्फ पाटणच्या दुर्गम भागातील २६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्राथमिक शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करण्याची मागणी, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद रेणुका कदम - चौधरी यांचे सीटीईटी परीक्षेत यश गळनिंब शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रकाश पाचपुतेंतर्फे पाणी बॉटल लिंब केंद्रातील १० शिक्षकांचे सीटीईटी परीक्षेत सुयश संघर्षाचा ज्ञानदीप : कृष्णा शंकर रोकडे इथे एप्रिल फुल तर रोजच होतो आहे !! शिक्षक घरी येऊन अॅडमिशन करून देणार मार्च ते जून दरम्यान शासनातर्फे जनजागृती राज्यस्तरीय हॅकेथॉनमध्ये हिंगोली प्रथम, सिंधुदुर्ग द्वितीय तर मुंबई उपनगर तृतीय जेजुरीत ९९ वर्षांच्या आजोबांनी दिली 'नवभारत साक्षरता' परीक्षा सीटीईटी फेब्रुवारी २०१६ चा निकाल १५.६८ टक्के शब्दगंध साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. संदीप सांगळे ढोरेगाव शाळेत अत्याधुनिक स्टेम लॅब विद्यार्थ्यांनी अनुभवली विज्ञानातील रोमांचक सफर.. शास्त्रज्ञ डॉ. अरविंद परांजपे यांची प्रेरणादायी भेट कराड तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार रुग्णसेवेतील 'प्रतिभे'ची यशोगाथा तप्त धरती - तहानलेले प्राण शाळांमध्ये क्रीडा, कला शिक्षकांची पवित्र पोर्टलद्वारे होणार भरती मुलांच्या सोशल मीडिया वापरावर नियंत्रण येणार, आशिष शेलार यांनी दिले संकेत नेवाशातील विद्यार्थ्यांनी खाऊच्या पैशातून सुरु केले वर्तमानपत्र वाचनालय समान व गुणवत्तापूर्ण शिक्षण हा बालकांचा मुलभूत अधिकार : डॉ. योगेश सुरवसे जिल्हास्तरीय शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेत शुभांगी भोसले यांचे यश रोहिणी औतडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : दीपक रोकडे शिरवळ मुले, मुलींच्या शाळेस भेट देऊन शिक्षण संचालक महेश पालकर यांनी केले कौतुक काटेसावर इतिहासाच्या पाऊलखुणाः शोध की विस्मृती? शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याची टीडीएफ संघटनेची मागणी दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाचे गुणपत्रक - प्रमाणपत्र आता एकाच वेळी जिल्हा परिषद शाळांचा पट वाढवण्यासाठी पालकांना करमाफी होण्याची शक्यता हवेलीत 'शिक्षक सक्षमीकरण'चा जल्लोष लोणी काळभोरमध्ये स्पर्धा उत्साहात नवोदयसाठी पात्र ठरलेल्या ९ विद्यार्थ्यांचा देवनांद्रा साकाप जि. प. शाळेत सत्कार जि. प. विद्यार्थ्यांनी काढला 'मुंबई अभ्यास दौरा' आमोंडीच्या संगीता वळसे यांना राज्यस्तर आदर्श शिक्षक पुरस्कार बोपोर्डी शाळेच्या मुलांची आज सातारा आकाशवाणीवर 'धमाल' जत तालुका शिक्षक संघाकडून डॉ. सलगर, प्रा. हिप्परकर यांचा सत्कार मणेरी केंद्रातील १२ शाळांना पुण्याच्या 'उर्मी' कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप तर्कशुद्ध विचार करणं हे माणूस असण्याचं पहिलं लक्षण बुवाबाजी : संतांच्या महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण आनंदाचं झाड बालसाहित्य पुरस्कार उत्तम सदाकाळ यांना प्रदान मुलाच्या वाढदिनी पालकांकडून कनेगाव शाळेला दिले पंखे भेट कन्नड तालुक्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा विशेष आनंद ICT विषय मान्य, पदे मंजूर.. तरीही शिक्षक नाहीत, डिजिटल शिक्षणात मोठा विरोधाभास
Ratnagiri,Maharashtra,India

जिल्ह्यात १,४९७ शिक्षक 'अतिरिक्त'

संचमान्यतेचा फटका, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण
जिल्ह्यात १,४९७ शिक्षक 'अतिरिक्त'

रत्नागिरी, देवरूख : राज्याच्या शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या संचमान्यतेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात मोठी उलथापालथ झाली असून तब्बल 1, 497 शिक्षक अतिरिक्त ठरल्याचे वृत्त सकाळ ने दिले आहे. 

पटसंख्येचा नवा निकष आणि आधारकार्ड लिंक नसलेल्या विद्यार्थ्यांमुळे जिल्ह्यातील १ हजार १७ प्राथमिक तर ४८० माध्यमिक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जिल्ह्यात विद्यार्थी नोंदणीचे काम अत्यंत प्रभावीपणे झाले असून, ९८ टक्के विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. केवळ २ टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी तांत्रिक कारणांमुळे किंवा आधार त्रुटींमुळे प्रलंबित आहे; मात्र नियमानुसार संचमान्यतेसाठी केवळ प्रमाणित (व्हॅलिड) विद्यार्थीच ग्राह्य धरले जातात.

हा मुद्दाही शिक्षक अतिरिक्त होण्यासाठी कारण ठरला आहे. इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आधार नोंदणीचे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांच्या दरम्यान असताना रत्नागिरीने ९८ टक्क्यांपर्यंत मजल मारली आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी करूनही, १ हजार ०१७ प्राथमिक आणि ४८० माध्यमिक असे एकूण १ हजार ४९७ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

जिल्ह्यातील ६ वी ते ८ वीच्या शाळांमधील पटसंख्या कारणीभूत ठरली आहे. १९ पटापर्यंत एक पदवीधर शिक्षक मंजूर असल्यामुळे मोठ्याप्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. पटसंख्या केवळ १०-२० ने कमी भरली, तरी पूर्णवेळ शिक्षकाचे पद कमी होत असल्याने शाळांचे प्रशासकीय गणित पूर्णपणे बिघडणार आहे.

अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना आता रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये सामावून घेण्याची (समायोजन) प्रक्रिया राबवावी लागणार आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकसंख्या कमी झाल्याने एकाच शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या गंभीर प्रश्नावर पालकमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेऊन एकही शिक्षक जिल्ह्याबाहेर जाणार नाही यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सध्या जिल्ह्यात समायोजन प्रक्रिया सुरू आहे.


अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नांवर तात्पुरता मार्ग

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या प्रश्नावर मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक झाली. या समस्येवर सध्या तात्पुरता मार्ग काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिकच्या ९७० पदवीधर शिक्षकांना रिक्त शाळांमध्ये उपशिक्षकांऐवजी नियुक्ती दिली जाणार आहे. त्यामुळे सध्या अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे. तसेच सध्या जिल्ह्याबाहेर बदलीचा विषय काहीकाळ लांबणार आहे.


रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन जिल्ह्याबाहेर न करता जिल्ह्यातच करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शिक्षकांवर ओढवलेले विस्थापनाचे संकट टळले असून, यामुळे शिक्षकांना कौटुंबिक आणि मानसिक स्थैर्य लाभेल.

- दिलीप देवळेकर, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघ

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.